महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने अण्णासाहेब पाटलांची जयंती साजरी
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
कष्टकरी गोरग़रीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांची आज, रविवार 89 वी जयंती साजरी करण्यात आली. चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी महा. राज्य कामगार सल्लागार समिती चे सदस्य तथा महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष कामगार नेते इरफानभाई सय्यद, कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, भिवाजी वाटेकर, खंडू मामा गवळी, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, गोरक्षनाथ दुबाले, बबन काळे,मारुती कौदरे, संपत मांढरे, अशोक साळुंखे, ज्ञानेश्वर घनवट, गिरीश देशमुख,चंद्रकांत पिंगट, सोमनाथ फुगे, सोपान गाडगे, सतीश शिंदे, धुळा शेंडगे, रोशन दोलताडे, शंकर शिंदे, तानाजी कोळेकर, कैलास तोडकर, चंदन वाघमारे, रत्नाकर भोजने व असंख्य कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यावेळी इरफानभाई सय्यद म्हणाले की, स्व.आ.अण्णासाहेब पाटिल यांच्यामुळेच,कष्टकरी गोरग़रीब जनतेला, माथाड़ी कामगाराना स्वाभिमानाने, सन्मानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या व त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात परिचय सांगताना पुढे म्हणाले,स्व.अण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी, मालवाहू माथाडी कामगारांना ताठ मानेने जगायला शिकवले. पाटण तालुक्यातील मंद्रुळ-कोळे या गावी जन्मलेल्या अण्णासाहेबांनी आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर उसाच्या चरकावर आपल्या कष्टकरी जीवनाला प्रारंभ केला. तेथून त्यांनी दारुखाना परिसरात अनेक ठिकाणी ओझे वाहण्याची कामे केली. ही कामे करीत असताना कामगारांना मिळणारा मोबदला, त्याची मालकांकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळायचे. या तळमळीतूनच त्यांनी माथाडी कामगारांच्या चळवळीचा लढा सुरू केला. अनेक राजकीय नेत्यांकडे पाठपुरावा करून माथाडी कायदा अंमलात आणला, आज माथाडी संघटना एक बलाढय़ संघटना म्हणून ओळखली जाते.