शबनम न्युज | दिल्ली (वृत्तसंस्था)
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन संसद भवनाच्या लोकार्पणानंतर विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी अगदी दोन वाक्यांचे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले की, संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत, असा खोचक टोला राहुल गांधींनी लगावला आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर तिरकस भाष्य केले आहे. ते म्हणाले, कार्यक्रम पाहिला. पण मला आनंद आहे की तिथे गेलो नाही, तिथे जे काही घडले ते पाहून मला काळजी वाटली, आपण देशाला मागे नेत आहोत का? हा कार्यक्रम फक्त मर्यादित लोकांसाठीच होता का? अशी विचारणा करत शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे.