शबनम न्युज / नांदेड
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. सध्या बहुतांश शाळा बंद असल्या तरी मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र शिक्षणासाठी मोबाईल घेण्याची ऐपत नसल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे.
या विद्यार्थिनीला दहावीला 75 टक्के गुण मिळाले होते. तिला बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा होता. त्यासाठी तिने आई-वडिलांकडे मोबाईल हवा असा हट्ट धरला होता.
मात्र तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. तिचे वडील हे मोलमजुरी करतात. त्यामुळे ते तिला मोबाईल घेऊन देऊ शकले नाही. यामुळे हताश झालेल्या एका गुणवान तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले.