◆ बांधकाम मजुरांना प्रश्ना साठी कार्याकर्त्यांना काम करण्याचे आवाहन◆
गवंडी,पेंटर,बिगारी,वायरमन,रस्ते खोदाई,आदी बांधमाक करणाऱ्या मजुरांसाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे, पिंपरी चिंचवड शहरात मोठया प्रमाणात बांधकाम मजूर,आहेत त्यांना नोंदणी करण्यासाठी शिवाजीनगर येथील कार्यालयात जावे लागते त्या ठिकाणी सतत हेलपाटे मारावे लागत आहे यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम मजुरांची नोंदणी होण्यास अडचणी येत असून अनेक बांधकाम मजूर योजनेपासून वंचित आहेत यामुळे माथाडी बोर्डाच्या कार्यालया प्रमाणेच बांधकाम मजुरांचे देखील स्वतंत्र कार्यालय पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्थापन करण्यात यावे अशी मागणी कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली आहे,
पिंपळे गुरव संजय गांधी नगर येथेल अण्णाभाऊ साठे स्मारक भवन मध्ये, बांधकाम मजूर रिक्षाचालक फेरीवाले घरेलू कामगार आदी घटकांची बैठक आयोजित करण्यात आली होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिताताई सावळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हादभाऊ कांबळे, शगुन चौक अध्यक्ष राजेश मायरामणी, आदी उपस्थित होते,
यावेळी बाबा कांबळे म्हणाले पिंपरी चिंचवड शहर हे झपाट्याने विकसित होणारे शहर आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम क्षेत्राचा विकास झाला बांधकाम मजुरांनमुळेच पिंपरी-चिंचवड शहरात मोठमोठे रस्ते इमारत उभे राहिले परंतु बांधकाम मजुरांची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे बांधकाम मजुरांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळांमध्ये दोनशे कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा आहेत परंतु प्रत्यक्ष बांधकाम मजुरांना या रकमेचा लाभ मिळत नाही पावसाळ्यामध्ये अनेक बांधकाम साइटवर अपघात होऊन कामगारांचा मृत्यू होत आहे, नोंदणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक मजुरांना मृत्यूनंतर मिळणारे लाभ मिळत नाहीत यामुळे मंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र कार्यालय सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी पाठपुरवठा केलेला आहे परंतु आत्ता पर्यंत हे कार्यालय सुरू झाले नाही पिंपरी चिंचवड शहरांमध्ये स्वतंत्र कार्यालय सुरू व्हावे अशी आपली मागणी आहे, ही मागणी मान्य न केल्यास कामगार कार्यलयवर मोर्चा काढण्यात येईल, याबरोबरच रिक्षाचालक फेरीवाले आणि इतर घटकांचे प्रश्न देखील सोडविण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहेत,असे बाबा कांबळे म्हणले ,
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी विलास थोरात,अरुण भोसले , बबन काळे यांनी परिश्रम घेतले,
रिक्षा ब्रिगेडचे प्रवक्ते अविनाश जोगदंड यांनी सूत्रसंचालन केले .