शबनम न्यूज / पिंपरी
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सामाविष्ट अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थी व दिव्यांग लाभार्थी यांचा तपशील व त्यांना वितरित करण्यात येणार्या अन्नधान्य बाबत सांख्यिकीय माहिती सादर करणेबाबत चीमागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी प्रधान सचिव अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, यांच्या कडे केली आहे.
दिलेल्या पत्रात म्हंटले आहे ऑल महाराष्ट्र रेशनिंग शोपकीपर फेअर प्राईस शॉप किपर फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष या नात्याने विनंती करू इच्छितो की, आपल्या विभागामार्फत दिनांक 15 जून 2021, रोजीचे प्रति ,नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई, महाराष्ट्र राज्यातील उपायुक्त पुरवठा (सर्व), महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी व महाराष्ट्र राज्यातील सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना वरील विषयासंदर्भात पत्र.
पत्र क्रमांक : असुयो-2021/प्र.क्र.13/ना.पु -28
उपरोक्त पत्रातील आपला विषय व संदर्भ पाहता सहसंचालक राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व एन. आय .सी यांचे संदर्भादिन दिनांक 14 डिसेंबर 2020, दिनांक 19 डिसेंबर 2020, व दिनांक 22 फेब्रुवारी 2021 यांचे संदर्भीय पत्रानुसार आपण आपल्या अधिकाऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेत असलेले SC/ST लाभार्थी, APL शेतकरी व दिव्यांग लाभार्थी तसेच त्यांना वितरित केलेले धान्य याबाबतची त्रैमासिक माहिती राज्यातील सर्व पुरवठा अधिकारी व सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडून आपल्या विभागाद्वारे मागविली आहे तसेच त्या बरोबर नवीन शिधापत्रिका वितरीत करताना SC/ST लाभार्थी, दिव्यांग व लाभार्थी व त्यांना वितरित अन्नधान्यांची स्वतंत्र नोंदवही व ऑनलाइन प्रणालीमध्ये घेण्याबाबतचा सूचना आपण आपल्या अधिकाऱ्यांना केलेले आहेत. परंतु आपले राज्यातील अधिकारी हे ही जबाबदारी रास्तभाव रेशनिंग दुकानदारांवर लादत आहेत. ऑनलाईन माहिती नोंदणी करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असून ती राज्यातील रास्तभाव रेशनिंग दुकानदारावर लादू नये. दुकानदार हे सर्वच शिक्षित आहेत असे नाही, तसेच रास्तभाव रेशनिंग दुकानदारांचे काम फक्त लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करणे हे असून अतिरिक्त जोखमीची जबाबदारी पुरवठा अधिकारी तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी रास्तभाव रेशनिंग दुकानदारांवर टाकू नये.
वरील सर्व आशय पाहता , आपण असा होत असलेला प्रकार त्वरित थांबवण्याचे आदेश राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे