शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
“अष्टपैलु संस्कृती कला अकादमी मुंबई व मासिक वृत्तपत्र ” न्यायप्रभात ” यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षरमंच गीत व काव्यसंग्रह भाग-२,या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक २४ जुलै २०२१,गुरुपौर्णिमा,कृ. प्रतिपदा,श्री शालिवाहन शके १९४३,गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन अत्यंत उत्साहाने संपन्न झाला.सदर काव्यसंग्रहामध्ये महाराष्ट्र राज्यासह इतर राज्ये व परदेशातील सुद्धा,साहित्यक्षेत्रातील एकूण ९० नवोदित कवी-कवयित्रींनी सहभाग नोंदवला असून,वाचनीय अशा विविध विषयांच्या सुमारे ९० उत्कृष्ट गीते व कवितांचा समावेश या काव्यसंग्रहात आहे.
काव्यसंग्रहाच्या निर्मिती आणि प्रकाशनाचे काम करणारे समिती संयोजन प्रमुख-श्री शिवाजी खैरे सर
(संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष व संपादक-मा.वृत्तपत्र ” न्यायप्रभात “)सहाय्यक-सौ.अनुसया खैरे मॅडम(सहसंपादक-मा.वृत्तपत्र”न्यायप्रभात “),तसेच काव्यसंग्रह संपादक मंडळातील :- प्रा.श्री नागेश हुलवळे-डोंबिवली,सौ.प्रतिमा काळे-पुणे,सौ.राजश्री मराठे-हैदराबाद,,सौ.सविता पाटील-जळगाव,प्रा.अक्षय पवार-अहमदनगर,सौ.अनुष्का गोवेकर-कोल्हापूर,सौ.चंदन तरवडे-अहमदनगर,कु.तृप्ती खैरे- मुंबई,प्रा.कु.फैरोजा मुल्ला-सोलापूर,सौ.सुरेखा नाईक-कोल्हापूर,सौ.सविता पाटील-जळगाव,सौ.सुनिता वावधाने-नांदेड,या सर्वांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष व संपादक कवी लेखक संगीतकार चित्रकार श्री शिवाजी खैरे सर यांनी भुषविले.काव्यसंग्रह प्रकाशन कार्यक्रमाला,जागतिक किर्तीचे साहित्यिक सर.डॉ.मधुसूदन घाणेकर,जेष्ठ साहित्यिक प्रा.अनिल उदावंत अहमदनगर, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.पल्लवी परुळेकर बनसोडे-वसई,संदिप गोपाळे साहेब-एल.आय.सी अधिकारी-ठाणे,सौ.अनुसया खैरे- सहसंपादक व शिक्षिका मुंबई या व्यक्ती प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या व त्यांनी आपल्या भाषणांतून साहित्य व कला विषयक उत्तम प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थाध्यक्ष व प्रमुख अतिथींनी आणि संपादक मंडळातील सर्व सदस्यांनी दिपप्रज्वलन केले.कुमारी तृप्ती खैरे व कुमार निषाद खैरे या दोन बालकलावंतांनी मधुर स्वरात ईशस्तवन सादर केले.संस्थेच्या सहसचिव सौ.राजश्री मराठे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संपादक व संगीतकार श्री शिवाजी खैरे सर यांनी स्वागत गीतातून अथितींचे स्वागत करुन संगीतमय वातावरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संस्थेच्या सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष व मासिक वृत्तपत्र न्यायप्रभातचे नवीमुंबई जिल्हा प्रतिनिधी लेखक कवी व शिक्षक प्रा.श्री नागेश हुलवळे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यसुमने अर्पित करून केले.
सर्व मान्यवरांची ओळख संस्थेच्या सदस्या सौ.चंदनताई तरवडे,सौ. सविता पाटील,सौ. अनुष्का गोवेकर,प्रा.फैरोजा मुल्ला यांनी केली.अक्षरमंच काव्यसंग्रह संपादक मंडळातील सर्व सदस्यांनी आपल्या मनोगत मधून अक्षरमंच काव्यसंग्रह प्रकाशनाचे व संस्थेच्या साहित्य-उपक्रमांत काम करताना आलेल्या अनुभवांचे काव्यसुमनांमधून ऋणनिर्देश व्यक्त करुन सर्व सारस्वतांना आपल्या साहित्य कलेचे उत्तम दर्शन घडविले.
श्री. संदिप गोपाळे साहेब यांनी या ऑनलाइन कार्यक्रमासाठी झूमअ़ॅप वापरण्यास देण्याचे विशेष सहकार्य केले.
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी या संस्थेच्या सांस्कृतिक व साहित्यिक समितीच्या सचिव कवयित्री शिक्षिका सौ.प्रतिमाताई काळे मॅडम आणि कवयित्री,गायिका सहसचिव सौ. राजश्री मराठे मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अतिशय उत्तम प्रकारे केले.आभारपुष्प प्रा.अक्षय पवार -अहमदनगर यांनी अर्पित करून कुमारी तृप्ती खैरे हिने सुमधुर स्वरात पसायदान सादर करून या अक्षरमंच गीत व काव्यसंग्रह प्रकाशन कार्यक्रमाची सांगता झाली.