शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
मोशी | प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोकण मधील पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, त्यांच्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून मदत कार्य सुरू आहे याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा निरीक्षक कविता संदेश आल्हाट यांच्या पुढाकाराने व लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशन अंतर्गत कोकणवासीय पूरग्रस्तांसाठी आर्थिक व वस्तुरूप मदत करण्यात आली. यामध्ये 400 साड्या ,एक हजार सॅनिटरी नॅपकिन ,महिला- पुरुष व लहान मुले यांच्यासाठी अंडरगारमेंट, अन्नधान्य, डाळ, तांदूळ, पीठ, गहू व एक हजार बिसलरी बॉटल तसेच जीवनावश्यक वस्तू फरसाण ,चहा ,पावडर, साखर, गुळ व घरगुती वापराच्या वस्तू यांची मदत करण्यात आली.
यावेळी प्रतिक्रिया देताना कविता अल्लाट यांनी सांगितले की ही मदत आपण कर्तव्य भावनेने केली , आहे आपण समाजाचे काही देणे लागतो या जबाबदारीतून सदरची मदत करण्यात आली, पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले हि मनात दुःखद भावना निर्माण करणारी घटना आहे, अशा परिस्थितीत आपण माणूस या नात्याने या अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी मदत करणे आपले कर्तव्य आहे मी माझ्या वतीने तसेच माझ्या लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशन वतीने ही मदत कोकणवासीय पूरग्रस्त नागरिकांसाठी पाठवीत आहे, या कार्याने प्रेरणा घेऊन शहरातील दानशूर व्यक्तींनी ही आपापल्या परीने या पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करावी.
तसेच कविता संदेश आल्हाट यांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी सढळ हाताने मदत केली या सर्व मदत करणार्या नागरिकांचे हि यावेळी कविता संदेश अल्लाट यांनी आभार व्यक्त केले व यापुढेही जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी या पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले