शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याबाबत शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक लिंक वर बारावीचा निकाल पाहता येईल याबाबत शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. - दिनकर पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे बारावी चा अंतिम निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया केली जात आहे. राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरू असून सध्या विभाग या मंडळाकडून आवश्यक असणाऱ्या माहितीचे संकलन करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर होईल, असे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात निकाल प्रसिद्ध होण्याचा ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उजाडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, निकाल पाहताना 10वी प्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांना गोंधळ होऊ नये, याबाबत राज्य मंडळाकडून काळजी घेतली जात आहे.
हि बातमी पण वाचा : MAVAL : आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
तब्बल 13 लाख 17 हजार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाने ऑनलाईन परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राच्या माध्यमातून बैठक क्रमांक अवगत करून दिले आहेत. मात्र, ज्यांना स्वतःचा बैठक क्रमांक माहित नाही अशा विद्यार्थ्यांनी मंडळाच्या या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.