पिंपरी, दि. १ ऑगस्ट २०२१ :- लोकमान्य टिळक हे उत्तम लेखक, संपादक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले आणि त्यांच्या सारख्या स्वातंत्र्य योध्द्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या निगडी येथील पुतळ्यास महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी महापौर माई ढोरे यांनी मत व्यक्त केले. या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, शैलजा मोरे, माधवी राजापुरे, अनुराधा गोरखे, माजी नगरसदस्य शशिकिरण गवळी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या लोकमान्य टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील समाजाच्या प्रश्नांना केसरी वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला.