पुणे | प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ आज लोकमान्य टिळक सभागृह, केसरी वाडा, पुणे येथे संपन्न झाला. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेंस कमिटीचे अध्यक्ष मा. नाना पटोले यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सेवादलाच्या वतीने प्रांताध्यक्षांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी मान्यवर व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटूंबियांचे कॉंग्रेस पक्षातर्फे स्वागत केले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेंस कमिटीचे अध्यक्ष . नाना पटोले यांनी स्वातंत्र्य सैनिक वसंतराव जोशी, उषातार्इ देसार्इ व लोकमान्य टिळक यांचे वंशज डॉ. दिपक टिळक, काकासाहेब गाडगीळ यांचे वंशज आनंद गाडगीळ, केशवराव जेधे यांचे वशच संताजी जेधे, शंकरराव मोरे यांचे वशंज दिपक मोरे, शिवराम राजगुरू यांचे वशंज सत्यशिल राजगुरू, बाबू गेनू यांचे वंशज किसन सैद, ना. सी. फडके यांचे वंशज विजय फडके, नारायण दाभाडे यांचे वंशज धनंजय दाभाडे, लिलाताई मर्चंट यांचे सुपूत्र सुहास मर्चंट यांचा यांचा शाल, सुताचा हार, टिळकांचा छोटा पुतळा व समान्यपत्र देवून सन्मान केला. यावेळी स्वा. सै. वसंतराव जोशी व उषातार्इ देसार्इ यांनी स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनाच्या विविध घटनांचा उल्लेख केला. यानंतर महाराष्ट्राचे कृषी व सहकार राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी भाषण केले. ते म्हणाले की, ”१५ ऑगस्ट २०२१ ला आपला देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो लोकांनी प्राणाची आहुती दिली. कॉंग्रेसचे नेते आणि लाखो सत्याग्रहींनी व क्रांतीकारकांनी ब्रिटीश साम्राज्याच्या विरूध्द लढून पारतंत्र्यापासून स्वातंत्र्य मिळवून दिले. आज केंद्रातील मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करीत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर सी.बी.आय., र्इ. डी. व इंकमटॅक्सची धाडे टाकत आहे. ज्या विद्यार्थी संघटना आपल्या हक्कासाठी आंदोलने करतात त्यांच्या विरूध्द देशद्रोचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरूंगात पाठवित आहे. मोदी सरकार लोकशाही संपविण्याचे काम करीत आहे. या अमृत महोत्सवानिमित्त कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या चळवळीत केलेल्या योगादानाची पूर्ण माहिती ध्वनीचित्रफित मार्फत आपण सर्वांनी पाहिली. युवक कॉंग्रेस आणि NSUI ने कॉंग्रेस पक्षाने केलेले बलिदान आजच्या पिढीला समजून सांगण्याची गरज आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्ष सामान्य जनतेच्या हितासाठी लढा देणार.”
या नंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नाना पटोले म्हणाले की, ”लोकमान्य टिळक सभागृह, केसरी वाडा येथून आपण ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाचा शुभारंभ करीत आहोत. लोकमान्य टिळकांच्या निवास स्थानातून या अभियानाचा शुभारंभ होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. स्वातंत्र्याच्या लढार्इ पुणे हे महत्वाचे केंद्रबिंदू होते. पुण्याच्या पुण्यभूमीतून लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले यांनी अनेक आंदोलने केली. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी मुखपत्रातून इंग्रज सरकारच्या कार्यपध्दतीवर टिका करायचे त्यांच्यावर इंग्रज सरकारने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी सांगितले की ‘स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, पं. नेहरू, डॉ. अबुल कलाम आजाद, सरदार वल्लभभार्इ पटेल यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरूध्दात लढा देवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये स्वातंत्र्य सेनानी व हुतात्म्यांच्या कुटूंबियांचे सन्मान केला. या हुतात्म्यांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही. आज मोदी केंद्रातील मोदी सरकार लोकशाही संपविण्याचे कारस्थान करीत आहे. प्रसार माध्यम जर सरकारच्या विरूध्द बोलले तर त्यांच्यावर इंकमटॅक्सची रेड टाकून त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेली घटना बदलण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. जसे ब्रिटीश राजवटीत आपण पारतंत्र्यात होतो तीच परिस्थिती आज देशात निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले की, पं. नेहरूंमुळे देशाचे नुकसान झाले. राज्यपाल कोश्यारी यांनी पं. नेहरू विषयी केलेल्या बेताल वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध करातो. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवन हे भारतीय जनता पक्षाचे कार्यालय केले आहे. पं. नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार होते. पं. नेहरूंमुळे देशाची प्रगती झाली. त्यांनी केलेले काम देश कधीही विसरू शकत नाही. कॉंग्रेस पक्षाकडे इतिहास आहे आणि हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करीत आहे. कॉंग्रेस पक्ष असे कधीही होऊ देणार नाही या देशातील गोरगरीब कष्टकरी व गरजू लोकांच्या हितासाठी कॉंग्रेस पक्ष सदैव लढा देर्इल. असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. केंद्रात सत्तेत आल्यावर कॉंग्रेस पक्ष या देशाला पूर्वीचे गतवैभव मिळवून देणार.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता रजपूत यांनी केले तर आभार प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी मानले.
यावेळी ज्येष्ठ कॉंग्रेसचे नेते उल्हास पवार, मोहन जोशी, रोहित टिळक, शाम पांडे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, लता राजगुरू, संजय बालगुडे, अविनाश बागवे, अमिर शेख, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, अजित दरेकर, डॉ. सतिश देसार्इ, विजय अंबुरे, सोनाली मारणे, विशाल मलके, भुषण रानभरे, रमेश अय्यर, सचिन आडेकर, प्रविण करपे, सतिश पवार, सुनिल घाडगे, शिलार रतनगिरी, मुख्तार शेख, वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, सुजित यादव, राजेंद्र शिरसाट, साहिल केदारी आदींसह कॉंग्रेस पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.