शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
कोरोना महामरिमध्ये जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. भारत याला अपवाद कसा असेल. GST, नोटाबंदी, सरकारी उद्योगांचे खासगीकरण , राज्यकर्त्यांची चुकीची आर्थिक, शैक्षणिक धोरणे यात करोनाचा महाभयंकर विळखा आणि लॉक डाऊन यामुळे सर्वसामान्यं माणुस महागाईच्या व आर्थिक संकटाच्या खाईत ढकलला गेला आहे.
त्याला दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत पडलेली आहे. शाळेच्या फी भरण्यासाठी पैसे नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव घरी बसवावे लागत आहे. शाळेच्या फी आभावी विद्यार्थ्यांना घरी बसलेले पाहून, त्यांच्या भविष्याविषयी चिंतने कित्येक पालकांना अश्रू ढाळल्याशिवाय पर्याय असल्याचा दिसत नाही.
विश्रांतवाडी कळस भागातील खासगी शाळेत इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीच्या मागील वर्षाची व चालू वर्षाची फी भरणे शक्य होत नसल्याने तिच्यावर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. याबाबतची माहिती क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले समता मंच , पुणे यांना समजल्यानंतर मंचाच्या अध्यक्ष आश्विन कांबळे यांनी शाळेतल्या मुख्याध्यापीका व मॅनेजमेंट यांच्याकडे पाठपुरावा करून सदर मुलीची सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षातील फी माफ करून घेऊन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गरीब विद्यार्थिनीस शिक्षणापासून वंचित होता होता वाचवले.
महात्मा फुले आणि सावत्रीबाई फुले यांनी ज्या पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्याच पुण्यात गरीब घरची विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सदर शाळेतील मुख्याध्यापीका व मॅनेजमेंट यांनी केलेल्या सहकार्याबद्दल क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले समता मंच, पुणे यांच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका व मॅनेजमेंट यांना पुष्पहार देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
त्या प्रसंगी सावित्रीमाई फुले समता मंच अध्यक्ष अश्विनी कांबळे, सेक्रेटरी प्रतिभा नाईक, उपाध्यक्ष रेखा जोलदापके, सदस्य प्यारी कोळी, मनिषा सूर्यवंशी, इत्यादी उपस्थित होत्या.