लेखिका – सिमरन सय्यद
आज शिक्षण हे आपले जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण हे महत्त्वाचे आहे. शिक्षणाने आपण आपले जीवन घडवितो. जीवनात शिक्षणाने आणि करिअर घडविता येतो. भविष्यात काय करायचे? याबाबत निर्णय घेता येतो, म्हणूनच शिक्षण हे आपल्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे.
सध्या कोरोना काळ चालू आहे. कोरोना विषाणू ने आपल्या जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे सगळीकडेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावले. त्यात विशेष म्हणजे लॉक डाऊन, कर्फ्यू अशामुळे सर्वच बंद करण्यात आले आहे. आणि यामुळे शाळा / महाविद्यालये बंद झाल्या. म्हणून आता विद्यार्थी शाळेत/ महाविद्यालयात जावू ही शकत नाही. म्हणून, शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण हा मार्ग निवडावा लागला.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जेवढे शक्य होईल व त्यापेक्षा जास्त शिक्षण देण्याचे प्रयत्न केले. काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नाही, तर कोणाला वेळ मिळत नाही तर जे ऑनलाइन लेक्चर करतात, अशा काहींना लेक्चर करूनही काय शिकवलं ते कळत नाही आणि ऑनलाईन शिक्षणासाठी चांगल्या इंटरनेटची आवश्यकता असते. आणि शहरात जरी इंटरनेट मिळेल तरी ग्रामीण भागात इंटरनेट मिळत नाही. नेटवर्क खराब चालतो, यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन लेक्चर थांबते, आवाज न येणे, अशा अनेक समस्या उद्भवतात. आणि यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
शाळा / महाविद्यालय बंद आणि आता परीक्षाही ऑनलाइन
ऑनलाइन परीक्षा म्हणजे आता घरी राहून अभ्यास न करता, वही पुस्तक जवळ ठेवून ऑनलाइन परीक्षा द्यायची, तर मग अभ्यास करायची काय गरज? असा विचार विद्यार्थ्यांच्या मनात. परंतु खरं तर ऑनलाईन शिक्षणामुळे गुणवत्तेचा स्तर खाली आला. विद्यार्थी अभ्यासापासून दूर चालले आहेत. आणि ऑनलाइन परीक्षा घेतल्याने सर्व उत्तीर्ण होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांची क्षमता नाही, असेही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आहेत. आणि यामध्ये जे विद्यार्थी नेहमीच अभ्यासाविषयी विचार करतात. नेहमी शिक्षणाला महत्त्व देतात. भविष्यात पुढे जायची ज्यांची इच्छा आहे. असे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेमुळे मागे राहत आहे. कारण, ऑनलाइन शिक्षणामुळे सर्वच उत्तीर्ण होत आहेत. शाळा महाविद्यालय बंद असल्याने परीक्षाही घेतली नाही. सर्वांनाच उत्तीर्ण करण्यात आले. आणि आता ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नाही.