शबनम न्युज | आकुर्डी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
संपूर्ण आकुर्डी परिसरातील रोजचा वीज पुरवठा खंडित होत आहे. त्या वर लवकरात लवकर उपाय योजना करण्यात यावे, अशी मागणी संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठाण आकुर्डी निखिल दळवी यांनी कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय भोसरी पुणे – २६, यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि,आकुर्डी परिसरातील आकुर्डी गावठान पंचतारा नगर गुरुदेव नगर गंगा नगर सुभाष पांढरकर नगर भंगारवाड़ी शुभश्री सोसायटी टेल्को कपुर सोसायटी दत्तवाड़ी रूपेश कॉलिनी श्रीकृष्णक्रांति नगर विठ्ठलवाड़ी एकता नगर विवेकनगर तुळजाई वस्ती या सर्व भागा मधील नागरिक रोजचा विज पुरवठा खंडित होत असल्या मुळे खुप त्रस्त झाले आहेत.
या सर्व भागामधे रोज विज पुरवठा दिवसा व रात्री खंडित होत आहे प्रत्येक भागात वेगवेगळ्या दिवसा ला पाणी पुरवठा वेळे नुसार होत आहेत नेमके पाणी येण्याच्या वेळे ला विज पुरवठा खंडित होतो त्या मुळे नागरिकांना पाणी साठा करुण ठेवता येत नाही काही नागरिकांच्या सोसायटी मधे मोटर लावल्या शिवाय पाणी सोसायटी च्या शेवटच्या मजल्यावर चढ़त नाही त्यामुळे नागरिकांना वापरन्यास लागणाऱ्या पाण्याची गैरसोया होत आहे कोरोना महामारी आजारा मुळे सर्व शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे सकाळी आठ वाजल्या पासुन लहान मुलांचे क्लास सुरु होतात कोणी मोबाईल वर्ती तर कोणाची कॉम्पीटर वर ऑनलाईन क्लासद्वारे शाळा सुरु आहे पण ऑनलाईन क्लास साठी इंटरनेट आवश्यक आहे. त्या साठी लोकांनी आपल्या घरा मधे Wi-Fi इंटरनेट कनेक्शन बसवले आहेत पण विज पुरवठा खंडित झाला कि ते Wi-Fi कनेक्शन देखील बंद पड़ते व मुलांची सुरु असलेली ऑनलाइन शाळा थांबते एकदा शिकवलेला अभ्यासक्रम परत शिकवला जात नाही विज पुरवठा खंडित होत असल्या मुळे ऑनलाइन सुरु असलेला अभ्यास क्रम बूडत आहेत विद्यार्थियांचे नुकसान होत आहे काही शाळांची ऑनलाईन परीक्षा देखील सुरु आहेत त्यांचे ही विज पुरवठा खंडित होत असल्या मुळे परीक्षा देताना अडचणी येत आहेत कोरोना मुळे लोकडॉन नियम लागु आहेत सर्व दुकाने व व्यवसाय सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु असतात त्याही वेळेत वारंवर विज पुरवठा खंडित होतो ज्या व्यापारी वर्गाचा व्यवसाय विज पुरवठया वर अवलंबून आहे त्यांनी कसा व्यवसाय करायचा हा ही प्रशन निर्माण होता आहे आकुर्डि परिसरातील व्यापारी वर्गाला देखील अडचणीना समोर जावे लागत आहे.
महावितरण विभागानी आकुर्डी परिसरातील कोणत्याही भागातील विज पुरवठा खंडित होऊ नये या करता लवकरात लवकर उपाय योजना कराव्यात आशी आकुर्डी मधील सर्व नागरिक व व्यापारी वर्ग यांची मागणी आहे या साठी आमच्या विठ्ठल प्रतिष्ठाण आकुर्डी च्या वतीने निवेदन देत आहे. असेही निखिल दळवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.