शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने लाभार्थ्यांच्या तसेच शिधापत्रिका यामधील पात्रता व निकषांमध्ये काळानुसार बदल करावे अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी प्रधान सचिव,
अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,यांच्याकडे केली आहे. निवेदनात नमूद केले आहे कि . ऑल महाराष्ट्र रेशनिंग फेअर प्राईस शॉपकिपर फेडरेशनच्या वतीने व अध्यक्ष या नात्याने मी आपणास विनंती करू इच्छितो की, काळानुसार लाभार्थ्यांच्या तसेच शिधापत्रिकेतील पात्रतेत व निकषांमध्ये बदल करण्याची अत्यंत आवश्यकता आहे यामुळे आम्ही आपणास नागरिकांच्या वतीने मागणी करत आहोत.
- 1. पिवळे अंत्योदय कार्ड याचे वार्षिक उत्पन्न 75 हजार ते 1 लाख रुपयापर्यंत असावे.
- 2. अन्नसुरक्षा योजना याची मर्यादा 59 हजार रुपयापर्यंत आहे तरी ही मर्यादा वाढवून 1.5 लाखापर्यंत करण्यात यावी.
- 3. केसरी (अपात्र कार्डसाठी) मासिक एपीएल चे धान्य चालू करावे.
- 4. केसरी (अपात्र कार्ड) धान्याचे दर गहू 10 रुपये व तांदूळ 15 रुपये पर्यंत असावे.
- 5. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी केलेल्या सर्वेवर शासनाने तात्काळ कार्यवाही करावी.
- 6. शुभ्र कार्डासाठी 3 लाख ते 5 लाख रुपये उत्पन्न करावे.
- 7. अन्नसुरक्षा व अंत्योदय कार्डाचा प्रकार एकच असावा.
- 8. शिधापत्रिका स्मार्टकार्ड यामध्ये असावी.
- 9. शिधापत्रिके चे कामकाज ऑनलाईन करावे.
उपरोक्त सर्व मागण्या सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत आज आपण जर वास्तविकता पाहिली तर सर्वसामान्य गरीबातला गरीबाचेही दरडोई उत्पन्न वाढले असून हे उत्पन्न 59000 रुपयांच्या वरती आहे यामुळे खऱ्या गोरगरीब जनतेला शासनाकडून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच आपण शिधापत्रिका याचे आधुनिक पद्धतीने स्मार्ट कार्ड पद्धतीने वापर अमलात आणला तर गैरव्यवहार ही होणार नाही व धान्यही योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे,
यामुळे बदलत्या काळानुसार लाभार्थ्यांच्या पात्रतेत व निकषांमध्ये बदल करणे गरजेचे आहे तसेच शिधापत्रिके मध्येही बदल होणे गरजेचे आहे तरी यावर आपण लवकरात लवकर कार्यवाही करावी.