विशेष लेख
येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतील. आम्हाला आपल्या देशाच्या संविधान, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा अभिमान आहे. पण असेच स्वातंत्र्य आपल्या शेजारील देश चीनच्या लोकांच्या नशिबी अद्यापही आलेले नाही.
चीनी सरकार कित्येक वर्षांपासून तिबेटी बौद्ध, विगर मुस्लिम, हाऊस ख्रिश्चन आणि फालुन गोंग साधनेच्या अनुयायांचा क्रूरपणे छळ करत आहे. त्यांच्या अनुयायांची अटक केली जाते, तुरुंगात ठेविले जाते, अत्यंत अमानुषपणे छळ केला जातो आणि कित्येकदा मारून टाकल्या जाते.
चिनी कम्युनिस्ट पक्षाकडून धार्मिक अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतातच. या लेखाद्वारे, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही माहिती आपल्याशी कशी संबंधित आहे.
वीगर मुस्लिमांवर अत्याचार १९४९ मध्ये कम्युनिस्ट चीनने शिनजियांग प्रदेशावर अतिक्रमण केल्यापासून, बीजिंगचे ध्येय शिनजियांगला राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एकीकृत करणे आणि तेथे हान समुदायाला मोठ्या प्रमाणात स्थायिक करणे आहे. यामुळे तेथील विगर रहिवासी अल्पसंख्याक झालेत.
येथील मुस्लिमांबद्दलच्या वृत्तीबद्दल चीनवर जगभरातून टीका होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, सुमारे दहा लाख वीगर मुस्लिमांना ‘री-एजुकेशन कॅम्प मध्ये ठेवण्यात आले आहे जिथे त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. जिनेव्हामधील वांशिक भेदभाव निर्मूलनावरील संयुक्त राष्ट्र समितीने कैदी विगर नागरिकांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली आहे.
फालुन गोंग साधनेवर अत्याचार फालुन गोंग ज्याला फालुन दाफा म्हणूनही ओळखले जाते, ही बुद्ध आणि ताओ विचारसरणीच्या सत्य-करुणा-सहिष्णुता या सिद्धांतावर आधारित एक साधना आहे. फालुन गोंग साधना चीनमध्ये १९९२ मध्ये श्री ली होंगझी यांनी सार्वजनिक केली. आज भारतासह जगातील १०० हून अधिक देशांमध्ये याचा सराव केला जात आहे.
फालुन गोंगचे आरोग्यविषयक फायदे आणि आध्यात्मिक शिकवणींमुळे, फालुन गोंग चीनमध्ये इतके लोकप्रिय झाले की १९९९ पर्यंत सुमारे ७० ते १०० कोटी लोकांनी याचा अभ्यास करायला सुरुवात केली. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व त्यावेळी फक्त ६० कोटी होते. फालुन गोंगच्या शांतताप्रिय विचारसरणीचा सुद्धा तत्कालीन चिनी शासक जियांग झेमिनला त्त्याच्या सार्वभौमत्वासाठी धोका वाटला आणि २० जुलै १९९९ रोजी त्यावर बंदी घातल्या गेली आणि काही महिन्यांतच फालुन दाफाला मुळासकट उपटून टाकण्याची मोहीम राबवल्या गेली. गेल्या 22 वर्षांपासून फालुन गोंग साधकांना चीनमध्ये अत्याचार, खून, ब्रेनवॉश, तुरुंगवास, बलात्कार, जबरी कामगार, अपप्रचार, निंदा, लूट आणि आर्थिक वंचितपणाचा सामना करावा लागत आहे.
हे अविश्वसनीय वाटेल, परंतु चीनमध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव केवळ मृत्युदंडाच्या शिक्षा झालेल्या कैद्यांमधूनच नव्हे, तर मोठ्या संख्येने तुरुंगात असलेल्या फालुन गोंग प्रॅक्टीशनर्सकडून येतात. स्वतंत्र तपासणीत असे दिसून आले आहे की, सरकारी रुग्णालयांच्या संगनमताने चिनी शासन, कैद्यांच्या बेकायदेशीर मानवी अवयव प्रत्यारोपणाच्या गुन्ह्यात सहभागी आहे. तिबेटी बौद्ध लोकांवर अत्याचार राजकीयदृष्ट्या तिबेट हा कधीच चीनचा भाग नव्हता. माओत्से तुंग यांना कम्युनिस्ट चीनचे स्वातंत्र्य तिबेटशिवाय अपूर्ण वाटले. शेवटी, ७ ऑक्टोबर १९५० रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तिबेटवर आक्रमण केले आणि १९५१ मध्ये तिबेटला गिळंकृत केले.
चीनचे हे रक्तरंजित दमन चक्र गेल्या ६० वर्षांपासून तिबेटमध्ये चालू आहे. चीन दलाई लामा आणि त्यांच्या समर्थकांना फुटीरतावादी म्हणून निषेध करतो. चीनवर तिबेटमधील धार्मिक दडपशाही आणि तेथील संस्कृतीशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. तिबेटमध्ये आज भाषण, धर्म किंवा प्रेसचे स्वातंत्र्य नाही आणि चीनची मनमानी सुरूच आहे.
हाउस क्रिस्चियन समुदायावर अत्याचार अंदाजे १०० कोटी ख्रिस्ती चीनमध्ये राहतात, परंतु त्यापैकी बहुतेक भूमिगत चर्च (घरातील चर्च) मध्ये पूजा करतात. कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीशी सहमत असलेल्या राज्य-मंजूर चर्चमध्ये सामील होण्यासाठी चीन सरकार ख्रिश्चनांवर दबाव आणते. कम्युनिस्ट पार्टी घरातील चर्चवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत कारवाई करत आहे. या अंतर्गत शेकडो चर्च पाडण्यात आले. बायबल जाळण्यात आले. राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे फोटो होली क्रॉस आणि येशूच्या जागी घरात लावण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
हा विषय भारताशी कसा संबंधित आहे?
चीन आज एक महत्त्वाची आर्थिक शक्ती असू शकतो, पण तिथले लोक मुक्त नाहीत. चिनी कम्युनिस्ट पार्टी लोकांमध्ये आपले सार्वभौमत्व टिकवण्यासाठी खोटेपण,छळकपट आणि फसवणुकीचा उपयोग करते. धार्मिक अल्पसंख्याकांवर अत्याचार करून, कम्युनिस्ट पक्ष चीनच्या बहुसंख्य समुदायाला सतत भीतीत आणि नियंत्रणात ठेवतो. यामुळेच लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचे आवाज तेथे उठत आहेत.
भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण आहेत. भारताजवळ चिनी कम्युनिस्ट पार्टीला शिकवण्यासाठी खूप काही आहे. भारताने चीनमध्ये घडणाऱ्या घोर मानवाधिकार उल्लंघनाचा निषेध केला पाहिजे. कदाचित भविष्यात भारत चीनमधील लोकशाहीच्या मार्गावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. हा विचार भारताला विश्वगुरूचा दर्जा देऊ शकतो.