शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार,साहित्यिक,न्यायप्रभात मासिक वृत्तपत्राचे संपादक व अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तसेच माजी माध्यमिक शिक्षक श्री.शिवाजी किसन खैरे सर(मुंबई) यांना जागतिक किर्तीचे जेष्ठ साहित्यिक,पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि विश्वविक्रमवीर सर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते फ्रेंड्स क्रिएशन संस्थेतर्फे २०२१ चा ऑनलाईन,आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार,१५ ऑगस्ट अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी झालेल्या ” अष्टपैलू राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यसंमेलन ” कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.तसेच याच सोहळ्यात फ्रेंड्स क्रिएशन संस्थेतर्फे सांस्कृतिक क्षेत्रात मौलिक योगदान देणा-या १० गुणवंतांना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते Friends International Award For Glorious Achievements In Cultural Fields प्रदान करण्यात आले.
सौ.अनुसया शिवाजी खैरे,श्री.नागेश सोपान हुलवळे,सौ.प्रतिमा अरुण काळे,सौ.राजश्री संदीप मराठे,सौ.अनुष्का अनिल गोवेकर,कुमारी फैरोजा मुल्ला जहांगीर मुल्ला,सौ.चंदन सुशील तरवडे,श्रीम.सविता पद्माकर पाटील,श्री.अक्षय शिवाजी पवार आणि कुमारी तृप्ती शिवाजी खैरे हे सदर आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक पुरस्काराचे मानकरी ठरले.
राष्ट्रकल्याणासाठी अविरतपणे निरपेक्ष आणि त्यागी भावनेने आपले जीवन समर्पित करणारे उच्च आदर्शवादी मूर्तिमंत व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव खैरे असे गौरवोद्गार श्री.खैरे यांना आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करताना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी काढले.प्रत्येकाने आपल्यातील सद्गुण राष्ट्रहिताच्या सत्कारणी लावावेत,असेही डाॅ.घाणेकर पुढे म्हणाले.”हा सन्मान समाजातील उच्च आदर्शवादाचा आहे कारण त्यामुळेच मी घडलो ” अशी कृतज्ञतेची भावना सत्काराला उत्तर देताना श्री.शिवाजी खैरे यांनी व्यक्त केली.डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित ‘डहाळी ”अनियतकालिकेच्या २५१ व्या अक्षरमंच काव्य विशेषांकाचे प्रकाशन श्री.शिवाजी खैरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी श्री.बाळकृष्ण अमृतकर,सौ.अनुसया खैरे आदी मान्यवरांची श्री.खैरे यांच्या विषयी गौरवपर भाषणे झाली.सौ.प्रतिमा काळे यांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे परिचय आणि आभार प्रदर्शन केले.सौ.राजश्री मराठे आणि सौ.चंदन तरवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात काव्यसंमेलन झाले. काव्यसंमेलनामध्ये सौ.वंदना गुंडावार,श्री.प्रफुल साने,सौ.सुरेखा हरपळे,श्री. संजय जाधव,सौ.वैशाली साळुंके,श्रीमती स्मिता सुहास भिमनवार यांच्या कविता सर्वोत्कृष्ट ठरल्या.सौ.अनुष्का गोवेकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.समेलनाचे प्रमुख अतिथी या नात्याने डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी गझल,कवितेचे करुन काव्यप्रेमींची मने जिंकली.कु.तृप्ती खैरे हिने सुमधुर आवाजात ” वंदे मातरम ” सादर केले आणि या सोहळ्याची सांगता झाली.