शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 15 मधील सेक्टर नंबर 26निगडी प्राधिकरण येथे गणेश तलाव विसर्जन घाट असून सध्या या तलावात जलपर्णी शेवाळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे या परिस्थितीकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही त्यामुळे गणेश विसर्जन अशा अस्वच्छ पाण्यात कसे करावे हा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे त्यामुळे येथील गणेश तलाव स्वच्छ करावे अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निखील दळवी यांनी पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे या निवेदनात नमूद केले आहे की सदर तलावात निगडी आकुर्डी प्राधिकरणातील शेकडो गणपतीचे विसर्जन दरवर्षी होत असते तरी नागरिकांच्या भावनेचा व श्रद्धेचा विचार करून त्वरित सदर गणेश तलाव स्वच्छ करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत.