शबनम न्यूज | मुंबई
प्रतिनिधी | मुंबई
कोणाला आरोपी करायचे आणि कोणाला नाही हा एनआयएला अधिकार आहे, हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे हास्यस्पद आहे. चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी हीरेन हत्या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करण्याचे काम केले. ज्यावेळी परमबीर सिंग यांच्या मनात भीती निर्माण झाली की, आपल्याला एनआयए अटक करू शकते, त्यावेळी त्यांनी भाजपसोबत ‘डील’ केले. त्यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे काम केले. भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमबीर सिंग हे एनआयए चे आरोपी नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी हीरेन हत्या प्रकरणात जो तपास होत होता त्याला वेगळे वळण दिले. ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची दिशाभूल करत होते, हे चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.