शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.
माननीय @CMOMaharashtra उद्धव साहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. pic.twitter.com/lYP9QHqw7T
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2021
Advertisement
उदय सामंत म्हणाले, “महाराष्ट्रात कालपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नद्यांना पूर आलाय. मराठवाड्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय, रस्त्यांवर पाणी आलंय, संपर्क तुटलाय. त्यामुळेच काही विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आल्या नाहीत. हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. त्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना मला सांगायचं आहे की त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही.”