शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकरी व सामान्य पूरग्रस्तांना पंचनाम्याशिवाय तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टी संपर्क प्रमुख,महा.राज्य अजित संचेती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदन नमूद केले आहे कि, अचानक सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी सामान्य नागरिकांचे खूप नुकसान झालेले आहेत याआधीच सलग एक वर्ष कोरोना सारख्या महामारी मुळे अजून कोणी आर्थिक नुकसान मधून सवरलेले नाही आहेत त्यात ह्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना चे शेतीचे व काही जणांच्या घरांचे नुकसान झाले आहेत,या पुरासारख्या परस्थिती मुळे काही जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे त्यांना व त्यांच्या परिवाराला तात्काळ मदत द्यावी पंचनामे नंतर करावेत पहिली त्यांना तात्काळ द्यावी, व लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीरकरावा,अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टी ही रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,पंचनामेशिवाय तात्काळ मदत द्यावी, असे हि दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.