शबनम न्यूज | अहमदनगर
अहमदनगर | प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या किंमती वाढवून केंद्र सरकार पैसे कमवत आहे. या देशातील दुचाकी, चार चाकी चालवणारे सामान्य नागरिक, ट्रॅक्टर वापरणारे शेतकरी, मध्यम वर्गीय या सर्वांच्या खिशाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली आहे, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येवला येथे माध्यमांशी बोलताना केला.
गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर वाढले की सर्व वस्तूंची दरवाढ होते. एकीकडे सामान्य नागरिक कोरोना महामारीचा सामना करत आहेत तर दुसरीकडे मोदी सरकार दर सतत वाढवत असल्याने त्यांच्या उत्पन्नावर मर्यादा आलेली आहे. हा फार मोठा अन्याय या देशातील जनता सहन करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे तो मध्यमवर्गीय फार मोठ्या संकटात सापडला असून शेतकऱ्यांनाही फार मोठा आर्थिक फटका पंतप्रधान मोदींनी दिला असल्याची खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली.