शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील राजे शिव छत्रपती बाल उद्यान मधील सुरक्षा रक्षक जाळी तुटली होती. ती तुटलेली जाळी आज विठ्ठल प्रतिष्ठाण च्या वतीने बसविण्यात आली असल्याची माहिती विठ्ठल प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष – निखिल दळवी यांनी दिली आहे.
प्रभाग क्रमांक १४ मधील राजे शिव छत्रपती बाल उद्यान मधील कंपाउंड वॉल वरील सुरक्षा रक्षक जाळी तुटली होती. उद्यानाच्या कंपाउंड वॉल पलीकडे सांड पाण्याचा वाहनारा मोठा ओढा ( नाला ) आहे. उद्यान मध्ये रोज लहान मुले खेळण्यासाठी येत असतात लहान मुले खेळताना सुरक्षा रक्षक जाळी तुटल्या मुळे कंपाउंड वॉल वरून ओढा मध्ये पडण्याची शक्यता आहे, व एखाद्या लहान मुलाचा अपघात होऊ शकतो या साठी सदर गार्डन मधील तूटलेली सुरक्षा रक्षक जाळी लवकरात लवकर दुरुस्ती करून परत बसवन्यासाठीची मागणी विठ्ठल प्रतिष्ठाण च्या वतीने कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग अ क्षेत्रीय कार्यालय पि.चि.मनपा यांना करण्यात आली होती परंतु त्यांच्या कडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने विठ्ठल प्रतिष्ठाण च्या वतीने पि.चि.मनपा आयुक्तांना सदर मागणी करण्यात आली होती. तरी देखील मनपा प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने आज विठ्ठल प्रतिष्ठाण च्या वतीने राजे शिव छत्रपती बाल उद्यान मधील सुरक्षा रक्षक जाळी तातपुरत्या स्वरुपात दुरुस्त करून बसविण्यात आली असल्याची माहिती विठ्ठल प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष – निखिल दळवी यांनी दिली आहे.
यावेळी विठ्ठल प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष – निखिल दळवी, मुज्जु खान, दिनेश पटेल, सतेज परब, प्रवीण सिंग यांच्या वतीने उद्याना मधील सुरक्षा रक्षक जाळी दुरुस्त करून बसविण्यात आली आहे.