शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पंजाब हे सीमेवरचे राज्य आहे आणि सीमेवरच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना अस्वस्थ ठेवल्यास त्याचे दुष्परिणाम होतात, याचा अनुभव यापूर्वी देशाने घेतला आहे. त्यामुळे केंद्राने त्यांचे आंदोलन गांभीर्याने घ्यावे, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
Advertisement
आंदोलनाबाबत केंद्र सरकारची भूमिका सामंजस्याची वाटत नाही. आंदोलनात पंजाबचे शेतकरी जास्त असल्याने केंद्र सरकारने त्यांचे आंदोलन गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. असे ही यावेळी शरद पवार यांनी म्हंटले आहे.
Advertisement