शबनम न्युज | चंद्रपूर
चंद्रपूर | प्रतिनिधी
कोणी कितीही आरोप केले आणि कितीही चौकशी लावली तरीही काहीही फरक पडणार नाही. खोटे आरोप केल्याने खूप प्रसिद्धी मिळते, यामध्ये विरोधकांना आनंद वाटतो. ईडी आणि पाऊस या दोन्ही गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेससाठी लकीच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.खासदार सुप्रिया सुळे कार्यकर्ता संवाद कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या.
Advertisement
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावी, आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत राहू. आमच्यावर टीका केल्यामुळे जर कुणी मोठे होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. ट्रकभर पुरावे कुठे गेले, हे महाराष्ट्राने बघितले आहे, कोणीही कितीही चौकशी करू द्या, सत्य बाहेर येईल, असेही त्या म्हणाल्या.
Advertisement