शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सह्याद्री अतिथिगृहात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली.यावेळी खासदार , ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी उपस्थित होते.
Advertisement
या बैठकीत खालील मुद्यांवर झाली चर्चा –
- अवजड वाहनांवरील वाहतूक कर माफ अथवा कमी करण्याबाबत चर्चा
- कोरोनामुळे आणि डिझेल महागाईमुळे अडचणीत असलेल्या वाहतुकदारांना दिलासा देण्याबाबत चर्चा
- त्याचबरोबर हायवेवरील वाहतुक कोंडींवरील उपाययोजनेबाबत चर्चा
- ट्रक आणि इतर अवजड वाहनांसाठी पार्किंग टर्मिनल उभे करण्याबाबतही चर्चा
- याशिवाय हॉटेल्स, मॉल्स आणि सिनेमागृह, नाट्यगृह यांच्यासाठी असलेले कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबतही चर्चा
- सिनेमागृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे, मात्र 50 टक्के क्षमतेची अट शिथिल करावी.
Advertisement