निलेश आल्हाट यांच्या जन संपर्क कार्यलया चे उदघाटन
शबनम न्यूज | पुणे
पुणे – पुणे शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष निलेश आल्हाट यांच्या मंगळवार पेठेतील जनसंपर्क कार्यलया चे उदघाटन केंद्रीय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय रिपाई नेते रामदास आठवले यांच्या हस्ते झाले , यावेळी आठवले यांनी रिपाई च्या माध्यमातून पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा नेहमीच जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करीत असतो, निवडणूक असो अथवा नसो, आपण जनतेसाठी आपला पक्ष जनतेसाठी या भूमिकेतून माझे प्रत्येक कार्यकर्ते नेहमीच लोकाभिमुख असतात असे सांगितले.
यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत निलेश आल्हाट यांचे कामाचे कौतुक कवितेतून केले. निलेशने घातली मला निळी पट्टी…….. तुझी आणि माझी जमली गट्टी……… आणि आता लवकरच करू विरोधकांची सुट्टी अशी कविता केली
यावेळी निलेश अल्लाट यांनी रामदास आठवले यांना फळाची टोकरी देऊन त्यांचे स्वागत केले या वेळी असित गांगुर्डे(सरचिटणीस – पश्चिम महाराष्ट्र) बाळासाहेब जानराव (महाराष्ट्र प्रदेश सचिव) .मंदार जोशी (ब्राह्मण आघाडी अध्यक्ष) संजयभाऊ सोनवणे (शहराध्यक्ष – पुणे शहर), रिनाताई आल्हाट (युवती आघाडी – उपाध्यक्ष – पुणे शहर), भिमराव चलवादी, मा. अॅड. अमित पाडळे, सह अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.