शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आकुर्डी गावठाणातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघाताच्या धोक्यात वाढ झाले असल्याचे निवेदन शिवसेना शहर संघटक बशीर सुतार यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, आकुर्डी गावात मुख्य रस्त्याचे काम चालू आहे. रस्त्यावर लावलेल्या चेंबरच्या जाळ्या दोन दिवसाला तुटतात आणि अपघात होतात. रस्त्यावर खड्डे आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे सुद्धा मुश्कील झाले आहे. रस्त्यावर खडीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्ता दुरुस्ती झाल्यानंतर निकृष्ट कामामुळे संपूर्ण रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या टायरमुळे खडीचे दगड उडून पायी चालणाऱ्या नागरिकांना लागत आहेत.शिवाय रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या काचांवरही हे दगड लागून नुकसान होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक व व्यापारी प्रचंड त्रस्त झाले आहेत. नियमित कर भरून महापालीकेकडून शिक्षा मिळत असल्याची भावना नागरिक व व्यापारी व्यक्त करीत आहेत.
रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेता यांनाही या खाडीचा त्रास होत आहे. दुकानातील व्यापारींना सुद्धा हे खडे जोरात लागतात. रस्त्याचे काम करणारा contractor कसे काम करतो हे पाहण्यासाठी महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला वेळ मिळत नाही का ? नागरिकांच्या कररूपी पैशातून पगार घेताना जबाबदार अधिकाऱ्यांना लाज कशी वाटत नाही. खडी पसरलेल्या या रस्त्यावर अपघात घडून जीवित हानी झाल्यास पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, स्थापत्य विभाग अ प्रभाग आणि संबंधित ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुंन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही दिलेल्या निवेदनात बशीर सुतार यांनी म्हटले आहे.