शबनम न्यूज | लोणावळा
ओंकार केदारी यांच्या संकल्पनेतून आणि ‘सफर 361 किल्ल्यांची ग्रुप मावळ’ यांच्या श्रमदानातून आज भातराशी येथे चाळीस फूट उंचीचा स्वराज्य ध्वज फडकविण्यात आला. समृद्ध सपाटीपासून सुमारे 3556 फूट उंचीवर हा स्वराज्य ध्वज फडकविण्यात आला. मावळातील सर्वात उंच भगवा अशीही या स्वराज्य भगव्याची ओळख निर्माण होणार आहे. यावेळी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. अतिशय आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
अर्ध्या मावळ्याचा दर्शन ज्या ठिकाणाहून घडतं अशा ताजे गावातील भातराशी म्हणजेच परमेश्वर टेकडीकडे आता सगळ्यांची नजर सहज पडणार आहे. या टेकडीला इतिहासामध्ये ऐतिहासिक स्थान होते. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला अध्यात्मिक महत्त्व देखील आहे. या टेकडीवर गेल्यास जुन्या पाउल खुणा आढळून येतात. टेकडीच्या पायथ्याशी जिवंत पाण्याचे झरे आहेत. लोहगड-विसापूर तसेच तुंग-तिकोना, मोरगिरी हे मावळातील किल्ले व एकवीरा मंदिर, नाणे मावळ, पवन मावळ या सर्व ठिकाणाहून ही टेकडी सहज दृष्टीस पडते. पण तिथे स्वराज्याचा चिन्ह नसल्यामुळे कोणाची जास्त नजर पडत नव्हती.