शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधि
पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू ऋतुराज गायकवाड याची भारताच्या T20 संघात निवड झाली आहे. जयपूर येथे १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात भारताच्या T20 संघाचे कर्णधारपद रोहित शर्मा यांच्या कडे आहे.
Advertisement
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये ऋतुराजने सर्वाधिक धावा काढल्या होत्या. तसेच ऋतुराजने श्रीलंकेत झालेल्या मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
भारताचा T20 संघ –
Advertisement
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, यजुर्वेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्शल पटेल, मोहम्मद सिराज.
Advertisement