शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात संपुर्ण महाराष्ट्रातील लोक स्थिरावले आहेत. त्या लोकांनी शहराच्या विकास कामात कररुपी योगदान दिलं आहे. मात्र, सत्ताधारी भाजपने लोकांचा अपमान करुन फूट पाडण्याचं कारस्थान पुन्हा सुरु केले आहे. यापुढे ‘गाववाला आणि बाहेरवाला’ राजकारण चालणार नाही, असे ट्विट राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी केले आहे. या वरून पार्थ पवार यांचे शहराच्या राजकारणात बारकाईने लक्ष असून त्यांनी या ट्विट द्वारे सत्ताधार्यांना एक प्रकारचा इशारा दिला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक स्थिरावलेत.विकासात कररूपाने सर्वांनीच समान वाटा दिलाय.त्यामुळे शहरी व बाहेरचा वाद उभा करून #सत्ताधाऱ्यांनी लोकांचा अपमान आणि फूट पाडणे थांबवावे.गाववाला व बाहेरचा हे राजकारण आता चालत नाही.आगामी निवडणुकीत लोक याला थारा देणार नाहीत #pcmc
Advertisement— Parth Pawar (@parthajitpawar) November 22, 2021
आगामी महानगरपालिका निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पिंपरी–चिंचवड महानगरपालिका भाजप च्या हातात आहे. आगामी निवडणुकीत भाजप ला नमवून राष्ट्रवादीला सत्ता काबीज करायची आहे. या निवडणुकीत मागील अनेक वर्ष पासून ‘गाववाला व बाहेरवाला’ असा भेद होत आला आहे. व यावेळी हि होणार परंतु ते आता होऊ देणार नाही किंवा मतदार हे भेद करू देणार नाहीत, असे पार्थ पवार यांचे म्हणने आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या पासूनच गाववाला म्हणून सत्ता आमच्याच हातात असावी, असे गाववाल्याना वाटत असले तरी या शहरात बाहेर गावाहून आलेले नागरिक हि स्थिरावले आहेत. ते हि कर रूपाने शहराच्या विकासात हात भर लावतात त्यांना हि कमी लेखता कामा नये, असा हि अर्थ पार्थ पवार यांचा आहे. याचाच अर्थ असा कि, राष्ट्रवादी आगामी महानगरपालिका निवडणुकीत हा भेद करणार नाही, सर्वांना समान अधिकार देणार.