शबनम न्युज | राहुरी
राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील चिखलठाण या गावातील शाळा हि १ते ८पर्यत आहे.,परंतु शाळेतील विदयार्थी पट संख्या ,वर्गवारीनुसार शिक्षक उपल्बध नाही. अपुर्ण शिक्षकांमुळे शालेय विद्यार्थी हे पुर्णतः शिक्षण घेत नाही, या अपुर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्याना पुढील भविष्यात फार मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होऊन त्यांचे जिवन उध्दस्त होईल.या शालेय विद्यार्थी शिक्षणाला जबाबदार कोण? असा सवाल पालक वर्गातून होत आहे.शेरी चिखलठाण या ठिकाणी एकूण आठ वस्ती शाळा आहे.
पहिली ते चौथी पर्यत वस्तीशाळेत शिक्षण पूर्ण घेऊन ते विद्यार्थी चिखलठाण येथे (जिल्हा परिषद शाळा )येथे पुढील शिक्षणासाठी येतात ,परंतू येथील कमी शिक्षकांमुळे शालेय विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचीत राहतात.लौकडाऊन मुळे एक ते दिड वर्ष शाळेय शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला आहेच,त्यात या शाळेतील शिक्षकांची कमतरता आणि शिक्षक संख्या कमी पाचवीनंतर पुढील वर्गासाठी पदवीधर शिक्षक उपल्बध नाही.येथील विद्यार्थी हे तालुकास्तरीय,जिल्हा स्तरीय पातळीवर नावलौकीक झालेले आहेच ,त्याच बरोबर गुणवंत ,खेळाडू,गायन,मनोरंजन कार्यक्रमात येथील शाळेचे नाविन्यपूर्ण नाव पटकावले आहे. एक ते आठ वर्गासाठी फक्त चार ,पाच शिक्षक उपल्बध आहे,त्यामुळे येथील शिक्षकांची दमछाक होते.
आदी गोष्टी लक्षात घेता येथील पालक वर्गातून एकच विचार येत आहे की, आपल्या पाल्यास खाजगी शाळेत प्रवेशाविषयी चर्चा होत आहे. चिखलठाण येथील शाळेत शिक्षक मागणी करून सुध्दा गटशिक्षणाधिकारी यांनी एकही शिक्षक उपलब्ध करून दिला नाही.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,पालक,ग्रामस्थ यांनी सांगितले की शाळेला शिक्षक उपल्बध नाही झाले तर विद्रोहि संघटना आंदोलन करणार आहे,. अशी चर्चा होत आहे.