शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ नोव्हेंबर ) :- साधू मोरया गोसावी समाधी मंदिरा समोर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येणाऱ्या पथारी धारक गोरगरीब कष्टकरी यांवर अन्यायकारक कारवाई करून त्यांच्या मुखातीळ घास हिरावून घेतला ज्या जागेवर हे छोटे पथारी व्यवसायिक त्यांच्या तीन फूट जागे मदे व्यवसाय करत होते त्या ठिकाणी पंधरा फुटाच्या मोठमोठ्या चार चाकी गाड्या लागल्या होत्या व दुचाकी गाड्या लागल्या होत्या, मग पाथरी धरकांनी व्यवसाय केला आतातर काय बिघडले असते, चारचाकी वाहनाने दुचाकी वाहनांना जागा आहे परंतु पाथरी धारकांना तिथं जागा नाही त्यांना थारा नाही बहुजन गोरगरिबांचे हे स्थळ नाही असा संदेश नेमका कुणाला द्यायचा आहे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे .
व्याजाने पैसे घेऊन लोकांनी कटलरी खेळणी साहित्य फुल भंडार व इतर विविध साहित्य खरेदी केले आणि ते विकण्यासाठी चिंचवड गावातील साधू मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरामध्ये दाखल झाले, परंतु त्या ठिकाणी असलेला पोलिसांचा फौजफाटा व महानगरपालिकेचे मग्रूर अधिकारी यांनी त्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केला आणि त्यांचं साहित्य जप्त केलं, हात मोकळे घेऊन घरी गेलेल्या अनेक गोरगरीब घटकांची दुसऱ्या दिवशी घरामध्ये चूल पेटले नाही ,त्यांच्या मुलांनी दोन घास देखील आज खाल्ले नाहीत, घरामध्ये स्मशान शांतता पसरली त्यांच्या मुखातिल घास कोणी हरवला ? मुलाबाळांच्या अन्नात कोणी माती कालवली ? दोन घास सुखाने मिळवण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या घटकांवर कोणी अन्याय केला, महापालिका आयुक्तांकडे हे विद्रूप करणारे माणसे आहेत म्हणून कोणी तक्रार केली ? गणेश चतुर्थी निमित्ताने महिन्यातून एकदा ही सर्व मंडळी मोरया गोसावी समाधी मंदिरासमोर आपले साहित्य विकून स्वतःच्या पोटाची आणि कुटुंबाच्या पोटाची खळगी भागवतात , ज्या तीन फुटाच्या जागांमध्ये हे सर्व पाथरी धारक आपला व्यवसाय करतात, तेथे दडपशाही दादागिरी करून तुम्ही चार चाकी गाड्या व टू व्हीलर लावण्यास परवानगी दिली परंतु व्यवसाय करण्यास परवानगी नाही दिली, हे अन्याय अत्याचाराच्या गरीब बहुजन वर्ग प्रति दोषांचे टोक आहे का हा अन्याय अत्याचार,, कशाचं द्योतक आहे, बारा बलुतेदार बहुजनसमाज कष्टकरी वर्गातील ही माणसं कोणाला नको आहेत, या प्रश्नाचे उत्तर समोर आलेच पाहिजे, मनामध्ये काहूर उठणारे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत अर्थातच निमित्त आहे मोरया गोसावी समाधी मंदिराजवळ वर्षानुवर्षे अनेक पिढ्यांपासून यात्रेनिमित्त चतुर्थीनिमित्त येणारे छोटे पथारी धारक विक्रेते, त्यांच्यावर झालेला अन्याय, पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये साधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणूनच ती आजही ओळखला जात आहे, अनेक वेळा शहरांमध्ये साधू मोरया गोसावी यांचा उल्लेख केला जातो.
साधू मोरया गोसावी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य इथल्या शोषित घटकांच्या घटकांच्या कल्याणासाठी झिजवला जनहितासाठी कार्य केले, त्यांचे कार्य सर्वदूर पसरले यामुळे बहुजन समाजातील शेतकऱ्यांनी त्यांच्या या कार्यने प्रेरित होऊन स्वतःच्या जमिनी दान केल्या आजही पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी मोरया गोसावी ट्रस्ट च्या नावे आहेत, त्यातला अनेक जमिनीवरती अतिक्रमण झाले, धनधगडे व राजकीय व्यक्तीने अनेक जमिनीवर कब्जा करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतालर, बेकायदेशीर माया जमवली तर काहींनी या जमिनीवर मॉल हॉस्पिटल, मोठ्या इमारती बांधल्या घर बांधले आणि बेकायदेशीर कब्जा केले, परंतु ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्याचं शेतकऱ्यांच्या पिढीतील गोरगरीब कष्टकरी पथारी धारक यांना मात्र साधू मोरया गोसावी यांच्या समाधी स्थळाचे जवळ महिन्यातून एकदा व्यवसाय करण्यासाठी तीन फुटाची जागा देखील मिळू शकत नाही ही अत्यंत दुर्दैवाची आणि मनाला क्लेश देणारी घटना आहे.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ! देह कष्टविती पर उपकारे,!!
हे संत तुकोबारायांचे वचन आज आठवण्याचं कारण म्हणजे स्वतःच्या अगदी या विरुद्ध स्वार्थासाठी लोकांचा छळ सुरू आहे याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे काल घडलेले हि घटना होय , ज्यांनी कोणी आयुक्तांकडे तक्रारी केल्या पोलीस बळाचा वापर करून गरिबांवर अन्याय केला त्यात आज स्वतःची पाठ थोपटून घेत असेल मी खूप मोठं काम केलं आणि त्या अनेक वर्षाच्या या परंपरेला खंडित करून गोर गरिबांना व्यवसाय करून नाही दिला, आज ते खूप खुश असतील त्यांच्या घरामध्ये उत्सव सुरू असेल परंतु मला त्यांना सांगायचे की एकीकडे तुमचा उत्सव सुरू असताना , पाथरी धारकांच्या घरात बघा आज अनेकांच्या घरांमध्ये साधी चूल देखील पेटली नाही त्यांना खायला अन्न नाही, कर्जाचा डोंगर डोक्यावर असून त्यांनी ज्यांचे कर्ज घेऊन व्यवसाय साठी तो मला जप्त झाला अत्ता कर्ज कसे फेडायचे व्याज कसे द्यायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे, अनेक समस्यांनी प्रश्नानेते घायाळ आणि व्याकुळ झालेली असतिल ,या अन्यायकारक कारवाईचा हिशोब झाला पाहिजे यावर साधक बाधक चर्चा झाली पाहिजे फोक खर कोण खोटं ते जनतेसमोर आलं पाहिजे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सुरू असलेला हा अन्याय अत्याचार जनतेसमोर आला पाहिजे.