शबनम न्यूज : पुणे (दि.२६ नोव्हेंबर ) :- हिवाळा हा भारतातील असा ऋतू आहे ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात, परंतु या ऋतूमध्ये सर्दी-खोकला आणि श्वसनाच्या समस्या यांसारख्या आजारांची भर पडू शकते; हे आजार याच ऋतूमध्ये सर्वाधिक पहावयास मिळतात आणि सामान्यतः कमी प्रतिकारशक्ती मुळे उद्भवतात.
च्यवनप्राश हे सुमारे 3000 वर्ष जुने आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरले जाते आणि खोकला आणि सर्दी यांसारख्या दैनंदिन संसर्गापासून संरक्षण प्रदान करण्यात मदत करते. डाबर च्यवनप्राश मध्ये अनेक ‘रासायनीक’ औषधी वनस्पती आहेत ज्या त्यांच्या इम्युनोमोड्युलेटरी इफेक्टद्वारे विविध प्रकारच्या संक्रमणांना प्रतिबंध करण्यास मदत करतात. भावी पिढ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, डाबर च्यवनप्राशने आज देशभरातील वंचित मुलांचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एक मेगा जागरूकता उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत, डाबर च्यवनप्राश डॉ. परमेश्वर अरोरा ( एम.डी. ए.वाय बी.एच.यू. वाराणसी सुवर्णपदक विजेता आणि वरिष्ठ सल्लागार आयुर्वेद) यांच्यासोबत एक जागरुकता सत्र आयोजित करत आहे. बदलत्या ऋतूमुळे, सामान्य बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याच्या गरजेबद्दल मुलांना शिक्षित करण्यासाठी हे रोग प्रतिकारशक्ती जागरुकता सत्र आयोजित करण्यात येत आहे.
लाल बहादूर शास्त्री हायस्कूल (किरकी कॅन्टोन्मेंट बोर्ड) मधील २५० हून अधिक मुलांसाठी आयोजित केलेल्या विशेष सत्रासह आज पुण्यात या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या सत्राचा उद्देश होता. मुलांना मूलभूत स्वच्छता आणि पौष्टिक आहाराद्वारे त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे मार्ग देखील यावेळी शिकवले गेले.
यावेळी बोलताना, डाबर इंडिया लिमिटेड, मार्केटिंग हेड- हेल्थ सप्लिमेंट्स,प्रशांत अग्रवाल म्हणाले, “कोविड-१९ च्या काळत, मजबूत प्रतिकारशक्ती ही प्रत्येक व्यक्तीची पूर्वीपेक्षा जास्त प्राथमिक गरज बनली आहे. आवळा, अश्वगंधा, गिलोय इत्यादी ४० हून अधिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या सामर्थ्याने डाबर च्यवनप्राश नेहमीच आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरले आहे. हे प्रमाणित करण्यासाठी, आम्ही डाबर च्यवनप्राश या विषयावर मोठ्या प्रमाणावर, बहुकेंद्रित, क्लिनिकल अभ्यास पूर्ण केला आहे. या क्लिनिकल अभ्यासात डाबर च्यवनप्राशच्या कोविड-१९ संसर्गावरील रोगप्रतिबंधक उपाय म्हणून फायदेशीर भूमिकेचे मूल्यमापन करण्यात आले.
अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की च्यवनप्राशचे सेवन न करणाऱ्या तुलनेत डाबर च्यवनप्राशच्या नियमित वापरामुळे कोविड-१९ संसर्गाचा धोका १२ पटीने कमी झाला. हे देखील लक्षात आले की डाबर च्यवनप्राशच्या नियमित वापरामुळे कोविड -१९ संसर्गाची तीव्रता ६ पट कमी होते.
अग्रवाल पुढे म्हणाले डाबर च्यवनप्राश प्रत्येक भारतीयाला १०० वर्षांहून अधिक काळ मजबूत प्रतिकारशक्ती प्रदान करण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा उपक्रम या वचनबद्धतेच्या दिशेने एक झेप आहे. आम्हाला थंडीच्या लाटेबद्दल काळजी आहे जी दरवर्षी अनेक लोकांचा बळी घेते. या उपक्रमाद्वारे, आम्ही या वंचित मुलांना च्यवनप्राश देण्याबरोबरच प्रतिकारशक्तीचे महत्त्व सांगु. डॉ. परमेश्वर अरोरा, एम.डी. (आयुर्वेद), बी,एच,यू. म्हणाले, “ऋतू बदलाच्या चक्रात तापमानात अचानक बदल होतो, ज्यामुळे खोकला, सर्दी आणि फ्लू सारखे आजार होतात. सर्दी, खोकला, श्वासोच्छवासाच्या समस्या इत्यादी आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे हा एक प्रभावी मार्ग आहे. बदलत्या हवामानाच्या चक्रातून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डाबर च्यवनप्राश हा एक प्रभावी उपाय आहे.”
या मोहिमेअंतर्गत डाबर च्यवनप्राशने भारतातील १८ शहरांतील आघाडीच्या एनजीओंशी हातमिळवणी केली आहे जसे की वाराणसी, प्रयागराज, लखनौ, अहमदाबाद, अमृतसर, जयपूर, भुवनेश्वर, कोलकाता, पाटणा, इंदोर, रायपूर, पुणे, औरंगाबाद, रांची, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि चंदीगड.