शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
दहावी- बारावी गुणवंत विद्यार्थी बक्षीस योजनेस मुदतवाढ मिळावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ यांनी मा.उप आयुक्त नागरवस्ती विकास योजना विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या कडे केली आहे.
राजू मिसाळ यांनी निवेदनात नमूद केले आहे कि पिपंरी चिचंवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत शहरातील दहावी- बारावी मध्ये ८० व ९० टक्के गुण प्राप्त करणा-या गुणवंत विद्यार्थ्याना बक्षीस रक्कम दिली जाते. या रकमेचा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उपयोग होत असतो. सद्यस्थितीत कोरोनामुळे परिक्षांचे निकाल उशिरा लागले आहेत. प्रवेश परिक्षा लांबल्या मुळे अणेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही झालेले नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांना बक्षिसी योजनेकरिता अर्ज करणेस अडचणी येत आहेत.
अकरावी व पहिले वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिया अद्यापही अंतीम झालेली नाही. योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, मुख्याध्यापकांचे सही शिक्के विद्यार्थ्यांकडे नसल्याने योजनेपासून विद्यार्थी वंचित राहू शकतात , त्यामुळे आपणास विनंती आहे की, या योजनेला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देणेत यावी.