शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील आकाश चतुर्वेदी सोशल फाउंडेशन वतीने नुकताच भारतातील पहिला आठवणीतील फेरफटका वॉक ऑफ फेम 28 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न झाला हा कार्यक्रम आकाश चतुर्वेदी सोशल फाऊंडेशन व सिद्धटेक मारकेश यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला या कार्यक्रमात डीसीपी आनंद भोईटे एसीपी श्रीकांत देसले तसेच सुनील टोम्पे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
या उपक्रमात सर्व वयोगटातील व सर्व स्तरातील लोक एकत्र चालत होते. सहभागी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी वेगवेगळे व्यावसायिक तसेच एलजीबीटी आणि वय वर्ष चार ते 85 पर्यंत ची सर्व लोक या पदयात्रेत सामील झाली होती.
कनिष्ठ ऑर्चिड शाळेत शिकणारा सात वर्षाचा विद्यार्थी नेहुल संतोष ढोरे आणि 85 वर्षीय उत्साही कौर चावला यांनी 1.5 दीड किलोमीटर अंतर चालून पार केलं. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
वेगवेगळ्या शहरातून 200 ते 300 स्पर्धकांचे व्हिडिओद्वारे समर्थन मिळत होते. अगदी नेपाळ वरून देखील स्पर्धकांची जनतेशी संवाद साधताना एसीपी म्हणाले, आमचं काम असे आहे की, आम्ही लोकांच्या समस्या आणि तक्रारी सोडविण्यासाठी वचनबद्ध आहोत. सरस्वती भवन या पदयात्रेत पुढे ते म्हणाले, व्यायामाने शरीर व मन निरोगी राहते तसेच शरीर चपळ होते कुठल्याही प्रकारच्या वाचनाने मन/बुद्धी विचारी आणि तीष्ण होते त्यामुळे दोन्हीचा विकास व्हायला हवा.
या उपक्रमात शिरीन शेख हिने फिनिक्स द गुड लाइफ पार्टनर या कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व केले. अरुण पवार हे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांसाठी त्यांनी पाण्याची व्यवस्था केली आणि रेड बुल पेयाची व्यवस्था केली. शहरातील प्रभावी माध्यम रेडिओ सिटी ने सुद्धा अधिकृतपणे या कार्यक्रमाला पाठिंबा दिला.
या उपक्रमात सहभागी लोकांना करिश्माने वॉर्म अप आणि कूल डाऊन झुंबा करण्याबाबत सुचवले. प्रत्येक सहभागी व्यक्तीस एक मेडल आणि इ – प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमात लोक अधिकार्यांबद्दलच्या कौतुकाच्या भावनेने प्रेरित झाले होते.
या उपक्रमाविषयी आकाश चतुर्वेदी यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले कि, सुरक्षा दलांनी केलेल्या बलिदानाची समाजाला जाणीव करून देणे हाच उद्देश व न्यायाचा मार्ग आहे तसेच तरुणांना त्यांचे करिअर निवडण्यासाठी व समाजात बदलण्यासाठी आजच उपक्रम प्रेरित होईल संगमन तो ही एक सुरुवात आहे आम्हाला असा समाज तयार करायचा आहे तो सुरक्षा संरक्षण बद्दल सामान्य जनतेमध्ये सकारात्मक प्रकाश टाकेल.