शबनम न्युज | पुणे
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.यासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेले संकेस्थळ http://mahacovid19relief.in यावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा. ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन युवा नेते पार्थ पवार यांनी केले आहे.
Maharashtra govt has announced ₹50,000 as ex gratia for kin of those who died due to Covid-19. Please spread the word and help those who are eligible by filling out the applications on https://t.co/5VJEbgyKT8
Advertisement— Parth Pawar (@parthajitpawar) December 2, 2021
महाराष्ट्र सरकारने कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ₹50,000 ची मदत जाहीर केली आहे. कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या http://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा. असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
पार्थ पवार यांनी ट्विट द्वारे म्हंटले आहे कि, महाराष्ट्र सरकारने कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ₹50,000 ची मदत जाहीर केली आहे. ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवा. आणि जे अर्ज भरून पात्र आहेत त्यांना मदत करा.