गजाला सय्यद
शबनम न्यूज | मुंबई
मोदी सरकारने कोविड च्या काळात लोकांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केले. कोविडचा अचूक डेटा जाहीर करावा, आणि बाधित कुटुंबांना चार लाख नुकसान भरपाई द्यावी, अशी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे. ही केवळ काँग्रेसची नाही, तर जनतेची मागणी आहे. असे वक्तव्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने कोविड काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाख रुपये द्यावी, अशी मागणी केली आहे.
The Modi government has ignored people's pain during Covid. The Congress party demands accurate Covid data be released and 4 lakh compensation be given to affected families. This is not just Congress' demand but of the people. #SpeakUpForCovidNyay pic.twitter.com/LPqTUbfef3
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 4, 2021
Advertisement
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, आपण सगळ्यांना मागील दीड-दोन वर्षांचा कार्यकाळ लक्षात आहे. ज्यावेळी कोविडची सुरुवात झाली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती,आरोग्याची व्यवस्थापन करण्याची आवश्यकता होती, पण ते कुठेही केंद्र सरकारने पुढाकार घेतला नाही. त्यावेळेला ज्या लोकांना घरी जायचं होतं अशा लोकांसाठी कुठलेही व्यवस्थापन केंद्र सरकारकडून केले गेले नाही. लोक बाराशे -बाराशे, तेराशे -तेराशे मीटर पायी जात होते. लोकांना अन्नधान्याचे आणि जेवणाचे प्रश्न निर्माण झाले होते आणि अशा वेळेला मोदी सरकार आपण दिवे लावा, थाळ्या पिटा हे सांगण्याचे काम करीत होते, आणि आरोग्याची व्यवस्थापन काय असणार आहे हे ही केंद्र सरकार त्या वेळी सांगत नव्हते. नंतरच्या काळामध्ये ऑक्सिजनच्या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये राज्याशी भनन करण्याचे काम असेल त्या ठिकाणी व्हॅक्सिनेशन च्या संदर्भामध्ये राहुल जी ने आवाज उचलला, पाऊल उचलला त्यावेळेस त्यांनी व्हॅक्सिनेशन आपल्याला देण्यापेक्षा 60 टक्के वॅक्सीन बाहेरच्या देशाला देण्याचे काम केलं होतं. सांगायचं तात्पर्य असं..आरोग्याचे व्यवस्थापन, लोकांना येण्या-जाण्यासाठी वाहनांचे व्यवस्थापन किंवा बाकीच्या गोष्टी या कुठल्याही गोष्टींचा विचार केंद्र सरकारने केला नाही. येणारे विमान जे आहे त्या विमानाला थांबवले पाहिजे, कोणत्याही गोष्टीचा व्यवस्थापन न करता केंद्र सरकारने त्या गोष्टी केल्या. आज या माध्यमातून आम्ही तेच सांगतोय covid-19 मध्ये जे मृत्यू झालेले आहेत, ती मृत्यूची संख्या आम्हाला माहित पडू द्यावी, ज्या कुटुंबात कोविड मुळे मृत्यू झाले आहेत त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 4 लाख रुपये द्यावे, अशी मागणी आम्ही केंद्राकडे सातत्याने करीत आहोत. महाराष्ट्र शासनाने पुढारपणा घेऊन पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पण नरेंद्र मोदीचे सरकार काय करत आहे. आज या संवादाच्या माध्यमातून राहुल जी ने आवाज उठवला आहे. हा जनसामान्यांचा आवाज आहे, लोकांचा आवाज आहे आणि यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हा,असे आवाहन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.