शबनम न्यूज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव ‘ राष्ट्रीय सेवा योजने’ च्या वतीने आळंदी नदी घाट परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमामध्ये एन.एस.एस.(N.S.S) चे शंभर स्वयंसेवक सहभागी झाले होते..विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन परिसर स्वच्छ केला. तसेच महाविद्यालय ते आळंदी घाट दरम्यानचा रस्ता स्वच्छ केला त्याचबरोबर आळंदी घाट संपूर्ण स्वच्छ केला.
या कार्यक्रमासाठी आळंदी नगरीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, आळंदी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अंकुश जाधव, पत्रकार मा.अर्जुनराव मेदनकर पुण्यनगरी, सामना व सह्याद्री, मा. सुरेश नागरगोजे व्यवस्थापक -विश्वशांती केंद्र एम.आय.टी, मा. वसंतराव शिंदे प्रमुख -आळंदी घाट बांधकाम विभाग,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ, प्रा. संजीव कांबळे कार्यक्रम अधिकारी- राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. रणजीत कदम कार्यक्रम अधिकारी – राष्ट्रीय सेवा योजना प्रा. कैलास अस्तरकर प्रमुख, कला विभाग इत्यादींची उपस्थिती होती.
घाट परिसर स्वच्छ केल्याबद्दल मा. अर्जुनराव मेदनकर यांनी मुलांचे कौतुक केले व स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मा. वसंतराव शिंदे यांनी आधुनिक काळात स्वच्छता किती महत्त्वाची आहे, हे सांगत घाट बांधकाम करण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड यांचे योगदान कसे आहे, या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी स्वच्छता हा घटक विद्यार्थी जीवनात कसा अनमोल दागिना आहे असे वक्तव्य करीत विद्यार्थ्यांनी नेहमीच स्वच्छतेचा वसा आणि वारसा जपला पाहिजे याबाबत विवेचन केले. मा. अंकुश जाधव यांनी स्वच्छता अभियान विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सौ. वैजयंता उमरगेकर यांनी महाविद्यालय आणि नगरपरिषद आळंदी नेहमीच स्वच्छते बाबत एकत्र काम करतात याही वर्षी कार्तिकी यात्रेनंतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी घाट परिसर स्वच्छ केला याचा आम्हाला अभिमान आहे असे मत मांडत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला मा. मयूर ढमाले खजिनदार – गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजीव कांबळे यांनी केले आणि सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर आभार डॉ. रणजीत कदम यांनी मानले.अशी माहिती महाविद्यालयाचे, प्रमुख,प्रसिद्धी विभाग, प्रा. प्रविण डोळस दिली.