गजाला सय्यद
शबनम न्यूज | पुणे (दि.११ डिसेंबर) :- “सोमवार पर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे!” ज्या कर्मचाऱ्यांचे संपकाळात निलंबन झाले आहे, ते रुजू होताच त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल. अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळ अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी व्यक्त केली आहे.
Advertisement
दरम्यान,संपकरी कर्मचाऱ्यांना युवा नेते पार्थ पवार यांनी आवाहन केले आहे. पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केले आहे. कामगारांनी कामावर रुजू व्हावे, त्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय स्तुत्य असून, संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. प्रवाशांनाही एसटी सुरु झाल्यास फायदा होईल. कामगारांचे नुकसान होणार नाही यासाठी सकारात्मक प्रतिसाद दोन्ही बाजूने गरजेचा आहे. असे आवाहन यावेळी पार्थ पवार यांनी केले आहे.
Advertisement