शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ जानेवारी) :- प्रभाग क्रमांक १४ मधील ओढ़े (नाल्यांची) स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान निखिल दळवी यांनी आरोग्य अधिकारी अ क्षेत्रिय कार्यालय निगड़ी पुणे – ४४ यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक १४ मधील दत्तवाड़ी विठ्ठलवाडी क्रांतिनगर विवेकनगर खंडेराय भाजी मंडई परिसरतील नाले, कोयना मार्केल येथील नाले, साईबाबा मंदिर येथील नाले या सर्व परिसरातील नाल्या मध्ये बऱ्याच दिवसांपासून स्वच्छता केली जात नाही. या सर्व नाल्या मध्ये मोठ्या प्रमाणात घान कचरा साठला आहे. या ओढे नाल्या मध्ये घान व कचरा साठल्यामुळे परिसरात खुप दुर्गन्धी पसरत आहे. डास, मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नाल्या शेजारी राहणारे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत .आकुर्डि परिसरातील नाले स्वच्छ केले जात नाहीत. अशा स्थानिक नागरिकांच्या तक्रारारी आमच्या कड़े येत आहेत तरी या सर्व बाबीनचा विचार करता या सर्व ओढ़े नाल्याची स्वच्छता करण्यात यावी या साठी प्रभाग क्रमांक १४ मधील स्थानिक नागरिकांच्या वतीने निवेदन देत आहे. असे ही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.