स्तुती दुआ,पार्श्व भोरा प्रथम क्रमांकाचे मानकरी
शबनम न्यूज : पुणे (दि.१० जानेवारी) :- भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवर आयोजित ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२२’ चा निकाल जाहीर झाला आहे.ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या स्पर्धेत स्तुती दुआ,पार्श्व भोरा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.राजवर्धिनी पवार,अंशिका यादव यांना द्वितीय तर रोहन कवडे,तेजस पाटील यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. सोनल सुर्वे ला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी आयएमईडी, एरंडवणे, पौड रोड, पुणे येथे भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांनी स्पर्धेचे उदघाटन केले.स्पर्धेत देशभरातून १३४ स्पर्धक सहभागी झाले.या स्पर्धेचे नववें वर्ष होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन गटात ही स्पर्धा झाली. प्रथम क्रमांकास रुपये दहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये आठ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास सहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.
डॉ.शरद जोशी,डॉ.जयंत ओक,डॉ.प्रवीण माने,डॉ.सोनाली धर्माधिकारी,डॉ.रणप्रीत कौर,डॉ. सचिन आयरेकर, डॉ श्रद्धा वेर्णेकर ,डॉ.हेमा मिरजी, डॉ. अनुराधा येसुगडे ,दीपक नवलगुंद ,डॉ बलजीत कौर ,डॉ. सोनाली खुर्जेकर,योगेश गुरव ,डॉ मुस्कान शर्मा यांनी परीक्षण केले .
‘गतीमान शिक्षणातून समाज परिवर्तन :डॉ. पतंगराव कदम’, ‘’, ‘ नवीन शिक्षण धोरणाची विद्यार्थी दृष्टीकोणातून अंमलबजावणी ‘, ‘ महिला सक्षमीकरण -भारताच्या विकासाची गुरुकिल्ली’, ‘ शिक्षकांपुढील साथीच्या रोगानंतरची आव्हाने’, ‘ संकटसमयी सर्जनशीलता आणि नावीन्य ‘, ‘ हास्य -सर्वोत्तम औषध ‘, ‘ स्वातंत्र्याची ७५ वर्षे ‘, ‘ शिक्षणात अध्यात्माची गरज ‘ , ‘ तरुणांमध्ये क्रिप्टो चलनाची लोकप्रियता ‘, अभिव्यक्ती स्वातंत्र्य : वरदान की शाप ‘ ‘हे स्पर्धेचे विषय होते.
या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली होती , त्यात डॉ सचिन वेर्णेकर ,डॉ प्रमोद पवार, डॉ सचिन आयरेकर, डॉ विजय फाळके, डॉ.हेमा मिरजी, डॉ. सोनाली खुर्जेकर, डॉ. श्रध्दा वेर्णेकर, प्रतिमा गुंड यांचा समावेश होता .