शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० जानेवारी) :- प्रभाग क्रमांक १४ मधील ज्ञानेश्वर कॉलनी व भंगारवाड़ी या परिसरातील रस्ता डांबरीकारण करा, अशी मागणी संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान निखिल दळवी यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना निवेनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक १४ मधील ज्ञानेश्वर कॉलनी व भंगारवाड़ी या परिसरातील रासत्यांची दुरावस्ता झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत हा रस्ता ड्रेनेज पाईप लाईन टकण्या साठी १ वर्षा आधी खोदला होता ड्रेनेज लाईन टाकून झाली पण त्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही पाणी पुरवठा विभाग कडून देखीली ही रास्ता खोदन्यात आला होता त्यांनी पण त्यांचे काम करुण रास्ता तसाच माती टाकून बुजवला तेव्हा देखीली डांबरी करण करण्यात आले नाही या परिसरातील व्यापारी व स्थानिक नागरिक रस्त्यावर पडलेल्या खड्डया मुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत रोज खड्डया मधे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आधळून पडत आहेत यामुळे अपघात देखील होत आहे आशा स्थानिक नागरिकांच्या तक्रारारी आहेत या सर्व बाबीनचा विचार करता , प्रभाग क्रमांक १४ मधील ज्ञानेश्वर कॉलनी व भंगारवाड़ी या परिसरातील रासत्यांचे डांबरीकरण करण्यात यावे या साठी स्थानिक व्यापारी वर्ग व स्थानिक रहिवासी नागरिक यांच्या वतीने आपणास निवेदन देत आहे. असे ही सदर निवेदनात नमूद केले आहे.