शबनम न्यूज : पुणे (दि.१२ जानेवारी) :- काव्यमित्र संस्थेच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, बाळशास्त्री जांभेकर, स्वामी विवेकानंद या महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्रा.नामदेवराव धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते राजेश भोईटे,प्रेरणादायी वक्ते लेखक राजेश दिवटे, काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर यांच्या हस्ते ” राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार ” झुंज संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजक हरिनाथ कांबळे,संदीप कोम्पले, बिबीशन पोटरे यांनी केले.कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडला.