शबनम न्यूज :मुंबई (दि.२० जानेवारी) :- राज्यात ओमायक्रॉनचे संकट वाढू लागल्यानंतर शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु होत असल्याची माहिती दिली आहे.
रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी अधिकार देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
Schools in areas where coronavirus cases are fewer can restart physical classes for Std 1st-12th and also start pre-primary classes from January 24 onwards. We are committed to safe resumption of schools in the state. #BackToSchool @MahaDGIPR pic.twitter.com/MesX5SNl5L
Advertisement— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 20, 2022
कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी शाळा सुरु करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्याबाबत जारी करण्यात आलेली नियमावली जिथं पाळली जाईल तिथेच, सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑनलाईन शिक्षण देखील सुरु ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य राहिलेलं आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.