शबनम न्यूज :मुंबई (दि.२० जानेवारी) :- शाळांबरोबरच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय होणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव आम्ही पाठवतोय. त्यांच्या आदेशानंतरच हा निर्णय होईल. कोरोनाचा धोका अजून गेलेला नाही, त्यामुळं निर्बंध लादूनच कॉलेज सुरू केली जातील. 15 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परिक्षा ऑनलाईनच होतील, यावर आम्ही ठाम आहोत, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
कॉलेज सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवणार
महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात प्रत्येक जिल्हाधिका-यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव आम्ही पाठवतोय. त्यांच्या आदेशानंतरच हा निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले.
राज्यातील महाविद्यालये चालू करण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्याशी चर्चा करणार..आणि प्रस्तावअंतिम मान्यतेसाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवणार.
Advertisement— Uday Samant (@samant_uday) January 20, 2022