शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ जानेवारी) :- ७३ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण जेष्ठ नेते व माजी नगरसेवक शंकरराव पांढरकर व दिलीपशेठ पांढरकर कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते ध्वजारोहण पांढरकर वस्ती आकुर्डी या ठिकाणी करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व लहान मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमास अॅड राजेंद्र काळभोर, अशोकराव पांढरकर, सुरेश लिंगायत, सिराज पठाण, लजपत प्रजापति, माजी नगरसेवक श्री निलेशआप्पा पांढरकर, सौ सोनाली वाल्हेकर, प्राजक्ता पांढरकर, रंजना बहिरट, शितल तेली , केतकी डेडसेना, सलोनी शर्मा , पार्वती बुरुज इत्यादी उपस्थित होते.
यावेळी पांढरकर यांनी सांगितले की, या दिवशी आपण भारतीय तिरंगा फडकावतो, राष्ट्रगीत म्हणतो तसेच रस्त्यावर चौका-चौकांमध्ये, शाळा, महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी शो आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय, भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, पोलीस आणि निमलष्करी दलांसह संरक्षण दल आपले कौशल्य, पराक्रम आणि सामर्थ्य प्रदर्शित करतात आणि राजपथावरील पथसंचलनांमध्ये भारताचे संरक्षण कौशल्य प्रदर्शित करतात, ज्याचे थेट प्रसारन टिव्हीवर केले जाते. स्टंट्सशिवाय एअरबाईक, मोटारसायकल, टँक आणि इतर शस्त्रांवरील स्टंट देखील भारतीयांसमोर प्रदर्शित केले जातात. यासोबतच सुंदर सजवलेले चित्ररथ असतात जे भारतातील भारतातील विविध राज्यांचे सौंदर्य आणि सांस्कृतिक परंपरा दर्शवितात. प्रजासत्ताक दिन एकाच गोष्टीचे वाईट वाटते की संविधान मधील काही भारतीय जनतेला स्वातंत्र्य असलेल्या काही गोष्टी सध्याचे सरकार हे बंद करत आहे त्यामधील प्रमुख गोष्ट म्हणजे या वर्षी आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय आणि या अमृतमहोत्सवी वर्षातला प्रजासत्ताक दिन झाल्यावर 1950 सालापासून परंपरा असणारी सांगीतिक धून समारोपाच्या ‘बीटिंग द रिट्रीट’ या समारोहात वाजणार नाही.
ही धून आहे ‘अबाईड विथ मी’ या मूळ अध्यात्मिक इंग्रजी गाण्याची. पण या वर्षी असं काय झालं की ७२ वर्षं न चुकता वाजणारी ही धून आता सैन्यदलाच्या गाण्यांच्या यादीतून बाहेर केली गेली आहे आणि या सगळ्या प्रकरणांत महात्मा गांधींचा काय संबंध तेवढंच नाही तर यावरुन एक राष्ट्रीय स्तरावरचा वाद सध्या का सुरू झालाय आणि त्याला राजकीय फोडणी का मिळाली आहे भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी च्या हुतात्म्यांनी जीवाचे बलिदान दिले ज्यांनी संविधान साठी अतोनात प्रयत्न केले अश्या विरांचा मान सन्मान सध्याचे सरकार करत नसल्याचे समोर येत आहे.
संविधान आणि स्वातंत्र या गोष्टी राजकारणी लोक राजकारणात उपयोग म्हणून करत आहे तरी मला असे सांगायचे की संविधान आणि स्वातंत्र्य ह्याबाबत कोणीही राजकारण करू नये आणि फायदा घेऊ नये . असंख्य भारतीय नागरिकांना याचं दु:ख होत आहे की प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्षी या भजनाला आपण सोडचिठ्ठी दिली. भाजपा सरकार असहिष्णुतेच्या या टप्पावर पोहोचलं आहे की त्यांच्या या अपमानजनक कृत्यांचा निषेध करण्यासाठीही शब्द उरले नाहीत. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीही ‘अबाईड विथ मी’ च्या हटवण्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश लिंगायत यांनी केले तर, हर्षवर्धन पांढरकर यांनी आभार व्यक्त केले.