वृत्तसंस्था
शबनम न्यूज : सोलापूर (दि.०८ फेब्रुवारी) :- कोरोनामुळे विद्यार्थ्यांची पावणेदोन वर्षे वाया गेली, ती भरून निघाली पाहिजेत. काही काळ शाळा बंद असल्याने अभ्यासक्रम मागे राहिला आहे, त्यासाठी तातडीने पााऊलं उचला ,राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत विजेत्या शाळांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
त्यामुळे आता शाळा शनिवार, रविवारही सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान ऑनलाईन शाळांचा उपक्रम यशस्वी झाला पण प्रत्यक्ष शाळेची मजा ऑनलाईनमध्ये येत नाही हे मान्य केले पाहिजे.असेही अजित पवार म्हणाले आहेत.