आम्हाला खात्री होती, की आज ना उद्या हे घडेल
वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.२३ फेब्रुवारी) :- नवाब मलिक यांच्या घरी पहाटे जाऊन ईडीनं जी कारवाई केली, त्यावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणी कोणतंही आश्चर्य वाटलं नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावर पत्रकारांनी विचारलं असता, आता काय बोलयाचं यावर.. यात काही नवीव नाही, असं शरद पवार म्हणालेत. कुठलं तरी प्रकरण काढून मलिकांना अडकवलं जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, की आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होती. त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करायची गरज नाही, असं शरद पवार म्हणालेत. कशाची केस काढली त्यांनी..? एक साधी गोष्ट आहे, साधा कार्यकर्ता असला, की दाऊदचं नाव घ्यायचं, आणि अडकवायचं, असले प्रकार सुरु आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय.
‘तुम्हाला माहीत नसेल कदाचित.. तुम्ही लहान असाल तेव्हा… त्या काळात माझ्यावरही असाच आरोप झाला होता.. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो.. याला आता 25-एक वर्ष झाली.. तरी आता तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं… जे लोकं केंद्राच्या विरोधात स्पष्ट आणि थेट भूमिका मांडतात, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे…’ असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.