वृत्तसंस्था
शबनम न्यूज : पुणे (दि.२३ फेब्रुवारी) :- मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर,भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आणि त्यांनी पद सोडले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्याने आता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. गंभीर आरोप किंवा अटक झाल्यास राजीनामा देण्याची या राज्याची परंपरा आहे. त्याचे पालन व्हावे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.