शबनम न्यूज : पुणे (दि.२६ फेब्रुवारी) :- रशिया-युक्रेन संघर्षामुळे अनेक भारतीय तेथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत अजित पवार म्हणाले, हजारो लोक युक्रेनमध्ये अडकले आहेत. 366 पालकांशी संपर्क आणि बोलणे सुरू आहे. त्यांच्याशी नियंत्रण कक्षामार्फत बोलणे सुरू आहे. त्यांना प्रशासनाकडून मोबाईल नंबर, ई मेल दिलेले आहेत. तसेच वेगवेगळ्या राज्यातील काही जणांना आज मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अन् आमचे याकडे लक्ष आहे. आपले नागरिक आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. सरकारच नागरिकांना आणण्याचा खर्च करत आहे, कोणीही याबाबत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
32 विद्यार्थी युक्रेनहून येणार
रशियानेच युक्रेनवर हल्ला केला आहे आहे. किती दिवस जिवंत राहील हे सांगता येणार नाही हे युक्रेनच्या राष्ट्रपतींनी सांगितलं आहे. भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. 366 विद्यार्थ्यांची नोंद आमच्याकडे झाली आहे. त्यातील 32 जण आज मायदेशी परततील. त्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी आम्ही सर्व व्यवस्था करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.